नाशिक – विशेष प्रतिनिधी
अवयव दान जनजागृती करत असताना नाशिक शहरामध्ये स्वराज फाउंडेशनची एक विशेष ओळख निर्माण झालेली आहे. तसेच कोरोना काळामध्ये केलेले उल्लेखनीय कार्य त्याचबरोबर विविध सामाजिक उपक्रम करत असल्यामुळे स्वराज फाउंडेशन चे काम अतिशय कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले.
स्वराज फाउंडेशनच्या गरबा उत्सवाच्या पोस्टरचे अनावरण नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालय येथे करण्यात आले. स्वराज फाउंडेशन चे संस्थापक नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी स्वराज फाउंडेशनच्या मागील सर्व उपक्रमाबद्दल माहिती दिली.
येत्या ३० तारखेला होणाऱ्या गरबा उत्सवाच्या वेळी सुद्धा अवयव दान जनजागृती केली जाईल तसेच नाशिककरांना या निमित्ताने या अवयव दान जागर कार्यक्रमात उपस्थित राहण्याची संधी स्वराज फाउंडेशनच्या मार्फत करून दिली जात आहे. त्या नाशिककरांनी सहभाग घ्यावा असे आवाहन याप्रसंगी आकाश छाजेड यांनी केले. ३० सप्टेंबर रोजी होणाऱ्या स्वराज गरबा उत्सवा दरम्यान नाशिक शहरातील तसेच राज्यातील विशेष उत्कृष्ट काम केलेल्या तसेच विशेष प्राविण्य मिळवलेल्या महिलांचा तेजस्विनी सन्मान पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे.
याप्रसंगी बीव्हीजी कंपनीचे उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख बाळासाहेब कंकराळे, संदीप सोनजे, अल्तमश शेख, योगिता खांडेकर, अनुपमा मराठे, मोहिनी लोहार, ब्रह्मकुमारी पुष्पा दीदी, अभिषेक छाजेड, शहाबाज मिर्झा, दीप्ती सोनजे, गौरव सोनार, संतोष ठाकूर, पुनम शिनकर, समाधान बागुल, राहुल सूर्यवंशी, सागर शिनकर, स्वामीराज सोनजे, विराज गांगुर्डे, आदी उपस्थित होते.

























