नाशिक – विशेष प्रतिनिधी
हिंदू धर्मात पवित्र मानला गेलेल्या… भगवान शंकराला अत्यंत प्रिय असणाऱ्या श्रावण महिन्यास आज (दि. २५) प्रारंभ होत आहे. विविध सण आणि व्रतवैकल्ये या कालावधीत केले जातात. श्रावण महिना भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे या महिन्यात शिवभक्त उपवास, पूजा आणि अभिषेक करतात. श्रावण महिन्यात धार्मिक कार्यांना विशेष महत्व असून या महिन्यात वैदिक पूजा, धार्मिक विधी केल्याने भक्तांना सुख, शांती, समृद्धी आणि मोक्ष मिळतो, अशी श्रद्धा असल्याची माहिती वे.मु.रोहितशास्त्री निरंतर गुरुजी यांनी दिली आहे.
‘जनहित अॉनलाईन न्यूज’ शी बोलताना निरंतर गुरुजी यांनी शिवभक्तांनी नियमितपणे शिवलिंगाला अभिषेक करावा आणि मंत्रांचा जप करावा, असे सांगितलं. श्रावण महिना भगवान शंकरांना समर्पित आहे आणि या महिन्यात त्यांची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. या महिन्यात वैदिक पूजा, धार्मिक विधी केल्याने भक्तांना सुख, शांती, समृद्धी आणि मोक्ष मिळतो, अशी श्रद्धा आहे. श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते, अशी मान्यता असल्याचे वे.मु. रोहितशास्त्री निरंतर गुरुजी म्हणाले.
या महिन्यात केलेली पूजा आणि धार्मिक विधींमुळे मोक्ष प्राप्ती होते, असे मानले जाते. श्रावण महिन्यात भगवान शंकर प्रसन्न होऊन आपल्या भक्तांवर कृपा करतात, असे मानले जाते. या महिन्यात वैदिक पद्धतीने पूजा करणे, धार्मिक विधी करणे, उपवास करणे आणि मंत्रजप करणे खूप शुभ मानले जाते. पौराणिक कथेनुसार, श्रावण महिन्यातच भगवान शंकरांनी समुद्र मंथनातून निघालेले विष प्राशन करून जगाचे रक्षण केले होते. या महिन्यात त्यांची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. धार्मिक विधी, वैदिक पूजा मंत्र जप अनुष्ठान करवायचे असेन तर अवश्य आपण संपर्क करू शकतात, असेही निरंतर गुरुजी म्हणाले.
{ वे.मु.रोहितशास्त्री निरंतर गुरुजी }
॥ नर्मदेश्वर प्रतिष्ठान ॥
वैदिकपूजा,धार्मिकविधी,वास्तू,
रत्न,ज्योतिष
७०५७९७११९७,८०८०१२१६३७

























