नाशिक – विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर महामार्गाकडून मुंबई आग्रा रोड व पुणे महामार्गवर जाण्यासाठी आगर टाकळी, उपनगर, गांधीनगर, मार्गे अवघड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू असते. गेल्या दोन ते तीन महिन्यांत या परिसरात अवघड वाहनाच्या अपघातात निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. याच अनुषंगाने या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्याच्या मागणीसाठी बुधवारी (दि. ८) उपनगर पोलीस ठाण्यावर प्रभाग क्रमांक १६ चे माजी नगरसेवक राहुल दिवे यांच्या नेतृत्वाखाली तसेच बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थितीत मोर्चा शांततेत संपन्न झाला.
सदर मोर्चास भाऊ बंगला, आगर टाकळी पासून सुरुवात होऊन रामदास स्वामी नगर येथे आला असता सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी व उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ, यांनी मोर्चेकरांशी संवाद साधला. नागरिकांच्या वतीने माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी निवेदनाद्वारे अवजड वाहतूक बंद करण्यासाठी गॅजेट मध्ये दुरुस्ती करावी अशी मागणी केली. सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ.सचिन भारी यांनी सदर मागणीचा सकारात्मक विचार करुन शासनाकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करुन सहकार्य करु असे आश्वासन दिले. याप्रसंगी माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी मोर्चाला मार्गदर्शन केले. तसेच माजी नगरसेविका सौ.आशाताई तडवी, सौ.वंदना मनचंदा, विजय ओहोळ तसेच पापा सैय्यद, अनिल जोंधळे, वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब शिंदे, दिलीप प्रधान आदिंनी मनोगत व्यक्त केले.

सदर मोर्चा मध्ये समाजसेवक प्रविण नवले, जितेंद्र उगावकर, बाबा पवार, संजय लोखंडे, सचिन पगारे, मिलींद पाटील, अभिजित कोल्हे, संजय लोखंडे, तुषार सोनकांबळे, गौरव केदारे, मनीष डांगे, प्रवीण पाटील, अभिषेक गुरव, अमोल शिंदे, मयूर केदारे, रोहित बनकर, दशरथ मोकळ, रमेश वाघ, अंकुश जाधव, उमेश निकम, प्रणित गायकवाड, संतोष तेलोरे, मयूर नवले, मनोज नवले, सर्जेराव घोडे, मिलिंद शिरसाट, अजय जाधव, शरद कांबळे, गणेश जाधव, रमेश पवार, मेघराज बनसोडे, बाळकृष्ण शिंदे, जाईन खान गणेश लोखंडे, निखिल लोखंडे, अभिजीत कोल्हे, मच्छिंद्र सोनवणे, दिलीप जगधने, अमोल फुलसुंदर, रवींद्र पाटील, बबन शेरे, भवानीश वानखेडे, रवींद्र वानखेडे, सुरेश केदारे, अमोल फुलसुंदर, मनोहर ढवळे, संदीप आहिरे, जतीन दिवेकर, तुषार थोरात,अंकुश जाधव, अर्जुन शिरसाठ,सचिन शिंदे,विशाल गोतीस, हिरामण रेवर, रमेश पवार,रमेश वाघ, एकनाथ ठाकूर तसेच सौ. राणी साळवे, पूजा मोरे अर्चना गोतीस, वैशाली निकम, गायत्री गोसावी, बाली पठाण, शीला जगताप, उषा सोनवणे, कांताबाई गोसावी, मनीषा आठवले, रत्नामाला पगारे, शोभा यशोध, निर्मला साळवे, शोभा साळवे, मनीषा गांगुर्डे, मनीषा मोरे, लताबाई पाटील, गंगाबाई हाके, मिरा शिंदे, लंका पगारी, मीनाक्षी साळवे, क्षमा शेख, विजया पगारे, कांचन अहिरे, मीना मनवार, संगीता बदाने, मेघा कडाळी, सुजाता धनगर, मीरा लोखंडे, कविता शिंदे, ज्योती पवार, चंद्रभागा वैद्य, पुष्पा लाड, ताईबाई जाधव, लताबाई इंगळे, भीमाबाई पगारे, सखुबाई पवार, मीराबाई भवर, मालती वाघमारे, प्राची शिंदे यांच्यासह आदीसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























