नाशिक – विशेष प्रतिनिधी
महानगरपालिकेच्या पूर्व विभागातील मौजे वडाळा (सर्व्हे नं. ४९,५०) येथील डी.जी.पी. नगर परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने राबलेल्या मोहिमेत रस्त्यालगत उभारलेली ३० अनधिकृत गाळे व पत्राशेड हटवण्यात आले. यावेळी महापालिका व पोलिसांचे मोठे पथक दिमतीला होते.
मनपा आयुक्त श्रीमती मनिषा खत्री, अतिरिक्त आयुक्त श्रीमती स्मिता झगडे यांच्या आदेशान्वये राबवण्यात आलेल्या या कारवाई दरम्यान उपआयुक्त (अतिक्रमण) श्रीमती सुवर्णा दखणे, नाशिक पूर्व विभागीय अधिकारी राजाराम जाधव, नाशिकरोड व नाशिक पश्चिम विभागीय अधिकारी चंदन घुगे, इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे, उपनगरचे पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ, नगरनियोजन विभागाचे उप अभियंता सोनवणे, प्रविण थोरात, निलेश साळी, बांधकाम विभागाचे खेमचंद पवार, शाखा अभियंता संजय चौधरी, सहायक अधीक्षक राजेंद्र भोरकडे, वरिष्ठ लिपिक गुणवंत वाघ तसेच अतिक्रमण विभागाचे कर्मचारी जीवन ठाकरे, निखिल तेजाळे, भगवान सुर्यवंशी, प्रभाकर अभंग व सहाही विभागातील अतिक्रमण कर्मचारी निर्मूलन वाहनांसह उपस्थित होते.
महापालिकेने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, अनधिकृत बांधकामे व विनापरवाना व्यवसाय स्वतःहून काढून टाकावेत; अन्यथा मनपाकडून कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच रस्त्यावर अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवर दैनंदिन कारवाई सुरूच राहील, असा इशारा अतिरिक्त आयुक्त श्रीमती स्मिता झगडे यांनी दिला आहे.





























