नाशिक – विशेष प्रतिनिधी
लोकराजा राजश्री शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीचे औचित्य साधत, नाशिक येथील संकल्प युवा प्रतिष्ठान,नाशिक या सामाजिक संस्थेने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, राज राजेश्वरी येथे शालेय साहित्याचे वाटप केले. या उपक्रमाद्वारे संस्थेने शिक्षणाचे अनमोल महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले.
विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व विशद करताना, तेच प्रगतीचे एकमेव साधन असल्याचे सांगितले होते. हाच मूळ संदेश कृतीत आणण्याच्या दृष्टीने शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन मोठ्या प्रमाणात होणे अत्यंत आवश्यक आहे. याच विचारातून संस्थेने हा उपक्रम हाती घेतल्याचे संस्थेचे अध्यक्ष जीवन जाधव यांनी याप्रसंगी सांगितले. शाळेचे उपमुख्याध्यापक सिंकदर पवार यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून आभार प्रदर्शनही केले. कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रगीताने करण्यात आली. शिक्षणाच्या प्रसारासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी संकल्प युवा प्रतिष्ठानने उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या स्तुत्य उपक्रमावेळी संस्था सचिव आकाश सोनवणे, खजिनदार राहुल बागूल, अजय जाधव, समाधान आहीरे, अलंकार भिसे, पंकज जाधव, योगेश देहाडे, करण जाधव, विजय रोकडे, महेश जाधव, साहिल दातार, अमोल कडलक यांच्यासह शालेय विद्यार्थी,शालेय कर्मचारी तसेच संस्थेचे अन्य सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























